नाशिकमध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. तसेच गंगापूर धरणातून ही पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे रामकुंड परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे. गोदा घाट परिसरातील अनेक लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
वाढत्या पाणीपातळीच्या पार्श्वभूमीवर गोदाघाट परिसरातील टपऱ्या आणि दुकाने तातडीने हटवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी नदीपात्र, घाट परिसर आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
No comments:
Post a Comment