Saturday, 27 November 2021

त्रिंगलवाडी किल्ल्याचा रक्षणकर्ता असलेला मारुतीराया...

त्रिंगलवाडी किल्ल्याचा रक्षणकर्ता असलेला मारुतीराया...

इगतपुरी परिसरातील सह्याद्रीच्या रांगेत वसलेला कातळकोरीव सुंदर पण दुर्लक्षित असा किल्ला म्हणजे त्रिंगलवाडी किल्ला. कल्याण, चौल या बंदरातून नाशिकमार्गे मालवाहतूक होणा-या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली गेली. किल्ल्यावर जाण्यासाठी कातळ फोडून पाय-या बनवण्यात आल्या आहेत.पाय-या संपताना वळणावर समोरच्या भिंतीवर ५ फूट उंचीची हनुमानाची भव्य मूर्ती कोरलेली आहे. उजव्या बाजूला कातळात कोरलेली अप्रतिम सुंदर प्रवेशद्वार आहे.

No comments:

Post a Comment

घारापुरी लेण्यांची त्रिमूर्ती — दगडात कोरलेली शिवाची महागाथा

मुंबईच्या किनाऱ्यापासून अवघ्या काही मैलांवर, अरबी समुद्राच्या कुशीत एक बेट आहे — घारापुरी. याच घारापुरी बेटावर असलेल्या घारापुरी लेण्या किंव...